Tuesday, October 13, 2009

.......चांगले मित्र........

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,

मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.

No comments: